चंचीच्या कप्प्यातून निरनिराळ्या वस्तू ठेवलेल्या असतात. विडा खाणारा त्या कप्प्यांमधून हव्या त्या वस्तू काढून घेऊन आपला विडा रंगवतो. शंकर पाटलांनी आपल्या मन:कोषात असेच विविध अनुभव जपून ठेवले होते. आणि लेखन रंगतदार करण्यासाठी त्यांनी त्या अनुभवांचाच उपयोग केला. खास कोल्हापुरी शब्दयोजना असलेली पाटलांची ही स्मरणचंची उघडली की वाचनविडा रंगायलाच हवा.